जगू पाहणाऱ्या माणसाचा आरंभिक आणि अंतिम आधार भाषा हा असतो. माणसाचे जेे काही चैतन्यमय संचित असते ते भाषेत साठलेले असते. भाषेचा आणि भाषाआकलनाचा पसारा हाताळणे सोपे नाही याची नम्र जाणीव ठेवतच तळटीपेचा उपक्रम सुरू केला आहे. भाषेची (विविध भाषांची) जडणघडण, तिचा विकास-विस्तार-लोप-पुनरुद्भव, भाषांचे आणि भाषाघटकांचे दुसऱ्या भाषांशी होणारे आदानप्रदान, त्यांचे प्रभाव आणि परिणाम, भूगोलात बंदिस्त…
